Updated by स्टार वन न्युज मराठी ™

16 फेब्रुवारी 2026.
अकोले ✍️ अहिल्यानगर
गणोरे ता. अकोले येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता दहावी मार्च 2026 च्या विद्यार्थांसाठी शुभचिंतन समारंभाचे आयोजन करण्यात आले. होते. यावेळी अतिशय उत्साहात विद्यार्थांसाठी परीक्षेला जाता जाता मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन मा. लालुशेठ दळवी (अखिल भारतीय मराठा महासंघ) हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर ग्रामीण पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मा. विकास काळे साहेब हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून व्याख्याते व साहित्यिक मा. संजयजी गोर्डे हे उपस्थित होते. 
यावेळी मा. प्रमुख वक्ते मा. संजयजी गोर्डे यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थांना मेहनत व चिकाटी ने कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न घेता परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी विनोदी शैलीमध्ये विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. यावेळी मा. संजयजी गोर्डे यांनी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आत्मसाद कराव्या जसे. आणि आपले ध्येय हे उरी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी धावावे. 
तसेच आपण देवाकडे 50 टक्के मार्क मिळावे म्हणून प्रार्थना करतो आणि देव ते मार्क्स आपल्याला देतो. या मागे सायकॉलॉजी आहे जो आपण विचार करतो ती गोष्ट पूर्ण होतेच..
त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनि आपल्या घरी मोठ्या पुष्ट्या वर मार्कर पेन ने. मला 90 टक्के पडायचे आहे अशा मोठ्या अक्षरात लिहून आपण येता जाता आपले लक्ष जाईल अशा ठिकाणी ते अटकून ठेवावे. जेणे करून तीच गोष्ट आपल्या मनात बिंबली जाईल आणे तेवढेच मार्क्स आपल्याला पडतील. ही अंधश्रद्धा नसून सायकॉलॉजी इफेक्ट आहे.

अशा सोप्या आणि विनोदी शैलीत विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहायक पोलिस निरीक्षक मा. विकास काळे साहेब यांनी देखील परीक्षेनंतर यशस्वी होण्याच्या विविध वाटा याविषयी सविस्तर माहिती दिली. अपयश आल्यानंतर खचू न जाता जीवनाला सामोरे कसे जावे याचे मार्गदर्शन केले. ज्याला जे क्षेत्र निवडायचे त्याने त्यावर भर द्या मला पण दहावी बारावी 50 टक्के च्या आतच मला मार्क्स होते. अस नाही की सगळ्यांना 90 टक्के मार्क्स पडतील तेव्हा स्पर्धा परीक्षा असतात कोणाला तलाठी होता येईल पोलिस होता येईल ग्राम सेवक होता येत. तेव्हा ज्याला ज्या क्षेत्रात आवड त्यावर फोकस करा.. अशा शब्दात API काळे साहेबांनी मुलांना मार्गदर्शन केले.
व्हिडिओ.
👇👇
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रावसाहेब उर्फ लालुशेठ दळवी साहेब (अखिल भारतीय मराठा महासंघ) यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी देखील विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
मा. संजयजी गोर्डे सर मार्गदर्शन करताना
- यावेळी व्यासपीठावर ,रावसाहेब उर्फ लालू शेठ दळवी
- संतोष आंबरे (सरपंच गणोरे ग्रामपंचायत )
- संत नामदेव किसन आंबरे (माजी पंचायत समिती सदस्य)
- भाऊसाहेब आंबरे (हरिदत्त कॉम्प्युटर )
- योगेश शेठ आंबरे (डाळिंब व कांदा व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर )
- जगन्नाथ आहेर (पत्रकार गणोरे )
- सचिन रेवगडे ( स्टार वन न्युज मराठी पत्रकार )
- राजेंद्र आंबरे( मा. अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणोरे )
अशोक गंगाधर आहेर (विविध सहकारी सोसायटी चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष गणोरे) उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी आर्यन आंबरे व वैष्णवी पोपेरे यांनी केले.प्रास्ताविक डॉ. मंगेश कडलग यांनी केले. आभार श्री भांगरे आर. डी यांनी मानले.



