महाराष्ट्र

दानपेटीत पडलेली सोन्याची अंगठी “देवीची ” ? तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी ✍️ दुर्गेश रमेश गायकवाड

मंगळवार दि. ०३ फेब्रुवारी २०२६.

  • तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न देण्याच्या वादग्रस्त ठरावाने भाविक संतप्त झाले आहेत.
  • पिंपरी-चिंचवड येथील एका भाविकाची सोन्याची अंगठी परत न मिळाल्याने या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनसाठी येतात. कोणी देवीचरणी डोकं ठेवतो, तर कोणी काही अर्पण करतो.

अनेक जण मंदिराच्या दनपेटीत यथाशक्ती दान अर्पण करतात.

मात्र आता याच तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त ठरताना दिसत असून त्यामुळे भाविक प्रचंड संतापले आहेत.

दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही असा निर्णय संस्थानाने घेतला आहे.

एखादी व्यक्ती देवळात जाते तेव्हा मनात श्रद्धा असते, विश्वास असतो.

पण तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ठरावामुळे आज हाच विश्वास डगमगताना दिसतोय.

दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तूही परत दिली जाणार नाही, ती दानच समजली जाईल असा वादग्रस्त आणि संतापजनक ठराव मंदिर संस्थानने केला आहे.

आणि या ठरावाचा मोठा फटका पिंपरी-चिंचवड येथील भाविक सुरज टिंगरे यांना बसला आहे.

सुरजे हे तुळजापूर येथील मंदिरात देवीच्या दर्शनााठी आले होते, तेव्हा दानपेटीत पैसे टाकताना चुकून त्यांची सुमारे एक तोळ्याची सोन्याची अंगठी दानपेटीत पडली. हे लक्षात येताच टिंगरे यांनी तत्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधत अंगठी परत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले.

  • दानपेटीत जी अगंठी पडली तिचा फोटो, कोणत्या दानपेटीत,कधी पडली याची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
  • तसेच सत्यता पडताळून अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी मंदिर संस्थानकडे लेखी अर्जही सादर केला.
  • त्याबाबत विचारणा केली असता, मंदिर संस्थानाच्या ठरावानुसार या मंदिरातील दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू परत देता येणार नाही, असे लेखी उत्तर सुरज टिंगरे यांना देण्यात आले.

त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. या निर्णयामुळे भावक अतिशय संतापले असून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप होत आहे.

श्रद्धा आणि विश्वासाच्या नावाखाली भाविक देवाच्या दरबारात येतो. देवीच्या दरबारात आलेल्या भाविकाला न्याय मिळणार की ठरावाच्या नावाखाली त्याची फसवणूक होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मंदिर संस्थान आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करणार का, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!