Day: February 14, 2026
-
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
निघोजकरांसाठी आनंदाची बातमी! दिड कोटींच्या निधीला मंजुरी; स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार
निघोजकरांसाठी आनंदाची बातमी! दिड कोटींच्या निधीला मंजुरी; स्वच्छतेचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार निघोज – दिनांक 14 फेब्रुवारी पत्रकार (योगेश खाडे)…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
निघोजसाठी दीड कोटींचा स्वच्छता प्रकल्प मंजूर राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश निघोज / प्रतिनिधी : निघोज व परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेला स्वच्छतेचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-दोन अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन प्रकल्पासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विशेष प्रयत्नांतून उपलब्ध झाल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी दिली. निघोज व परिसराची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजारांच्या घरात असून, गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येमुळे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. ग्रामपंचायतीने विविध स्वच्छता अभियान राबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र दीर्घकालीन उपाययोजनेसाठी स्वतंत्र प्रकल्पाची गरज भासत होती. यासाठी स्थानिक पातळीवर प्रस्ताव तयार करून संबंधित मान्यवरांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा करताना विखे पाटील पिता-पुत्रांसह आमदार दाते यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने प्रयत्न केले. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकल्पांतर्गत घनकचरा वर्गीकरण, प्रक्रिया केंद्र उभारणी, सांडपाणी निचरा व्यवस्था आणि मैलागाळ व्यवस्थापनाची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे निघोजसारख्या मोठ्या गावातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. पर्यावरणपूरक उपाययोजनांमुळे परिसरातील आरोग्य स्थितीतही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे. महायुतीतील तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य केल्याची माहिती देत सचिन पाटील वराळ यांनी सर्वांचे आभार मानले. “निघोजच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल महत्त्वाचे असून, आगामी काळात आणखी विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. निघोजच्या विकासाच्या दृष्टीने हा स्वच्छता प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून ग्रामस्थांत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
निघोजसाठी दीड कोटींचा स्वच्छता प्रकल्प मंजूर राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील व काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश निघोज-…
Read More » -
उर्वरित जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब
निघोज, दि. 14 फेब्रुवारी (योगेश खाडे) उर्वरित जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब…
Read More » -
अहिल्यानगर ✍️ अहमदनगर
लोकनाथ चषक स्पर्धेचा अंतिम दिवस आज जल्लोषात साजरा होत असून सायंकाळी ठीक सहा वाजता लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या वितरणासह भव्य समारंभ पार पडणार आहे.
निघोज, दि. १४ फेब्रुवारी (योगेश खाडे) लोकनाथ चषक स्पर्धेचा अंतिम दिवस आज जल्लोषात साजरा होत असून सायंकाळी ठीक चार वाजता…
Read More »